Home Blog Page 95

काळ्या जादूसाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ काड्या जप्त करत अनिल देशमुखांच्या फार्म हाऊसवर वन विभागाचा छापा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काळ्या जादूच्या होम हवनासाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ पांढऱ्या काड्यांचा लाखोंचा साठा अनिल देशमुख यांच्या फार्म हाऊसवर वन विभागाने धडक कारवाई करत जप्त केला आहे. ही धडक कारवाई ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये डोळखांब वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बांधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर करण्यात आली आहे. या प्रकरणी वन कायद्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वन अधिकारी व पोलीसांनी संयुक्त तपास सुरु केला आहे.

आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत गोरख धंदा सुरू

ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील वनक्षेत्र डोळखांब हद्दीतील आजोबा पर्वत रांगामध्ये दुर्मिळ पांढरीची लाकडे आढळून येतात. या पांढरी काड्याचा उपयोग धार्मिक विधी, होम हवन व कोरीव काम करण्यासाठी करण्यात येतो. त्यातच अनिल देशमुख यांच्या बांधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर या काड्याचा बेकायदेशीर साठा साठवून त्याची विक्री केली जात असल्याची खबर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली होती. या माहितीच्या आधारे फार्महाऊसवर वन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला होता. या छाप्या दरम्यान पांढरीची लाकडे तोडण्यासाठी व साठवण करण्यासाठी वन विभागाची कुठल्याही प्रकाराची परवानगी नसताना अनिल देशमुख यांच्या मालकीच्या फार्म हाऊसमध्ये आदिवासी मजुरांकडून कवडीमोलाने ही दुर्मिळ लाकडे गोळा केली जात होती. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत हा गोरखधंदा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

अघोरी कृत्य करण्यासाठी देखील वापर

वन विभागाने छापेमारीत फार्महाऊसमधून पांढरीच्या काड्या, मशीन लाखोंचे साहित्य जप्त केले आहे. अंधश्रध्देकरिता या लाकडाचा वापर केला जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. या पांढरीच्या काड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. या काड्यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी वापरतात. तर याचा सर्वांत जास्त उपयोग अघोरी कृत्य करण्यासाठी देखील वापर केला जातो. याशिवाय काळी जादूच्या हवणासाठी या पांढरीच्या काड्यांचा वापर केला जातो. जप्त केलेला मुद्देमाल आसनगाव हद्दीत असलेल्या वन विभागाच्या डेपोत ठेवण्यात आला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात जल्लोष साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव निश्चित करून “मशाल” या निवडणूक चिन्हावर शिक्कामोर्तब केले, यानंतर संपूर्ण राज्यातच ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यात ठीक ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे.

११ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांतर्फे जल्लोष करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी मशाल पेटवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा मारत शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी आतिषबाजी करून पेढे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख सदानंद थर्वळ, नासिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने, कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, महिला आघाडीच्या कविता गावंड, मंगलाताई सुळे, किरणताई मोंडकर, शिल्पा मोरे, प्राजक्ता दळवी, किशोर मानकामे, अरविंद बिरमोळे, सतीश मोडक, प्रकाश तेलगोटे, अभिजित थर्वळ, शाम चौगले, प्रकाश खाडे, सचिन जोशी, लता नाटलेकर, ममता घाडीगांवकर आदी सह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘३७ वी किशोर व किशोरी’ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रत्नागिरीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईमध्ये भारतीय खो-खो महासंघाच्या व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ‘३७ वी किशोर व किशोरी’ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील ४८ संघ आणि जवळपास नऊशेहून अधिक खेळाडू आणि पदाधिकारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने होणार्‍या या स्पर्धेची जोरदार तयारी रत्नागिरीत जिल्हा खो-खो असोसिएशनकडून सुरु झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खो-खोची तीन मैदाने तयार केली जात आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत. भैय्याशेठ सामंत यांच्या पाठबळामुळे या स्पर्धेचे ‘शिवधनुष्य’ पेलण्यास पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार योगेश कदम, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम यांच्यासह अनेक संस्थांचे पाठबळ या स्पर्धेला मिळत आहे. रत्नागिरीत नऊशेहून अधिक खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक व संघटनेचे पदाधिकारी दाखल होणार असून, रत्नागिरीकरांना खो-खोच्या वेगवान खेळाची मजा लुटता येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे, जिल्हाध्यक्ष बाळू साळवी, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, राजेश कळंबटे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, सुरज आयरे, प्रशांत कवळे, राजेश चव्हाण, सचिन लिंगायत, प्रसाद सावंत, सुरज आयरे, सैफन चरके आदी यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर खर्‍या अर्थाने मैदानी खेळांना चालना मिळाली असून विविध स्पर्धाही उत्साही वातावरणात पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार व आरती कांबळे या दोन खेळाडूंनी आपल्या खेळाचा ठसा उमटविला आहे. रत्नागिरीत खो-खोमध्ये अनेक छोटे खेळाडू तयार होत असून, या स्पर्धेमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

 

‘इनडोअर क्रिकेट विश्वचषक’ स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय; पुरुष गटात भारताने पाच पैकी चार लढती जिंकल्या. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिडनी येथे सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताने श्रीलंकेवर १२ धावांनी पराभव करून निसटता विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना १६ षटकात १०५ धावा केल्या तर श्रीलंकेने ९३ धावा करताना जोरदार लढत दिली.

१६ षटकांच्या सामन्यात भारताच्या सलामवीरांनी आजही चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २१, २४, २३ व ३८ धावा करत एकूण १०५ धावा करत मजबूत स्थिति मिळवली. भारताच्या शेवटच्या जोडीनेही जोरदार फटकेबाजी करत भारताला शंभरी पार करून दिली. तर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २१, २५, ३१ व १६ धावांवर रोखलं. आजच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला जोरदार लढत दिली मात्र भारताने १२ धावांनी विजय साजरा केला. भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात श्रीलंकेचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावाफलकतून २५ धावा कमी करता आल्या तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही १६ षटकात भारताचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकतून सुध्दा २५ धावा कमी झाल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले व उत्तम झाले त्यामुळेच कडव्या प्रतिकारनंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला. विशेष म्हणजे शेवटच्या जोडीने केलेल्या फटकेबाजीनेच भारताचा विजय सुकर झाला.

भारता तर्फे पहिल्या जोडीने धनुश भास्कर (८) व दैविक राय (१३) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरवतीनंतर दुसऱ्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१२) व अफ्रोज पाशा (१२), तिसऱ्या जोडीतील सुरज रेड्डी (१६) व अरिज अजीज (६) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नामशीद व्हि. (१३) व मोहसिन नादाम्मल (२५) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.

श्रीलंकेच्या पहिल्या जोडीमधील निलंथा वीजेकून (१९) व ऍण्डी सोलोमोंस (२), दुसऱ्या जोडीमधील रुमेश पेरेरा (१०) व चंडिमा अबेकूण (१५), तिसऱ्या जोडीतील कोलिथा हापूयाराच्ची (१०), व मालशान रोड्रिगो (२१) तर शेवटच्या जोडीतील निलोचना पेरेरा (९) व दासून रंदिका (७) यांनी कडवी लढत दिली.

भारताच्या नामशीद व्हि. २, धनुश भास्कर, अफ्रोज पाशा व सूरज रेड्डीने यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला तर श्रीलंकेच्या निलंथा वीजेकूनने ३ व मालशान रोड्रिगो, दासून रंदिका यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला.

या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार श्रीलंकेच्या निलंथा वीजेकून देऊन गौरवण्यात आले. भारताच्या २२ वर्षाखालील मुलांच्या संघाने सुध्दा द. आफ्रिकेला पराभूत करून विजय मिळवला.

 

व्हॉट्सऍपवर येणार नवीन अपडेट्स, ग्रुप चॅटवर १०२४ युजर्स येणार एकत्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

व्हॉट्सअ‍ॅप वर नेहमी सतत नवीन नवीन अपडेट येत असतात. मेटा-मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍप आता काही बीटा परीक्षकांसाठी १०२४ वापरकर्ते गटांमध्ये जोडण्याची क्षमता आणत असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सऍप बीटा इन्फो नुसार, हे वैशिष्ट्य अँड्रॉइड आणि आयओएस साठी व्हॉट्सऍप बीटा वर उपलब्ध आहे, परंतु ते बीटा परीक्षकांच्या विशिष्ट अपरिभाषित संख्येपुरते मर्यादित आहे.

व्हॉट्सऍपवर नवीन अपडेट येणार समोर

कंपनीच्या अहवालामध्ये नमूद केले आहे की जर एखाद्या वापरकर्त्याला हे वैशिष्ट्य त्यांच्या व्हॉट्सऍप खात्यावर उपलब्ध आहे की नाही हे तपासायचे असेल तर ते एक गट तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा अस्तित्वामध्ये असलेल्या खात्यामध्ये नवीन सहभागी जोडू शकतात. अहवालामध्ये असेही म्हटले आहे की, व्हॉट्सऍप भविष्यामध्ये प्रशासकांना या मोठ्या गटांवर अधिक नियंत्रण देण्यासाठी नवीन साधने देखील विकसित केली जात आहेत.

‘व्हॉट्सऍप प्रीमियम – बीटा टेस्टर’

कंपनीने २५६ लोकांच्या गटामध्ये ५१२ लोकांना जोडण्याच्या क्षमतेसह मे महिन्यामध्ये नवीन वैशिष्ट्ये आणली आहेत. तसेच अलीकडेच प्लॅटफॉर्मने काही देशांमधील व्यवसाय खात्यांसाठी ‘व्हॉट्सऍप प्रीमियम – बीटा टेस्टर’ हे आणखी एक वैशिष्ट्य सादर केले आहे. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, व्हॉट्सऍप मध्ये काय बदल होतो.