Home Blog Page 122

गुन्हे शाखा घटक-३ कल्याण, घटक-४ उल्हासनगर व खंडणी विरोधक पथकाने घरावर दरोडा घालणाऱ्या टोळीस केले शिताफीने अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विठठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत घरावर दरोडा घालणाऱ्या टोळीस घटक-३ कल्याण, घटक-४ उल्हासनगर व खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर पोलीसांनी जकी कोंडूराम जगयासी राहणार श्रीराम चौक, उल्हासनगर नं.४ च्या फिर्यादीवरून अटक केली आहे.

१) अकबर इमान खान, राहणार संतोषनगर, मुंब्रा , २) आसिफ वारीस अली शेख, राहणार उत्तरशिव, दहिसर, मुंब्रा, ३) शिवसिंग विरसिंग शिकलकर, राहणार अटाळीगांव, आंबिवली, कल्याण, ४) राहुलसिंग बबलूसिंग जुनी, राहणार शेलार चौक, त्रिमूर्तीनगर, पाथरली रोड, डोंबिवली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी जकी जगयासी हे घरी झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने, डीव्हीआर, ८० हजार रूपये रोख रक्कम असे एकूण १० लाख ४० हजार रूपये किंमतीचे रोख रक्कम दरोडा घालून चोरून नेले बाबत दिलेल्या तक्रारी वरून विठठलवाडी पो.स्टे. गु. रजि.नं. २७८ / २०२२ भादंवि कलम ३९५, ३९७, ४५२ सह भा. ह. कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ हा गुन्हा दिनांक ३०.०८.२०२२ रोजी दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता विठठलवाडी पो.स्टे सह घटक-३ कल्याण, घटक-४ उल्हासनगर व खंडणी विरोधी पथक यांच्या एकूण ८ पथकाची नेमणूक करण्यात आली होती. नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर पथकाने तपास करून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे ४ आरोपींना अटक करून पुढील तपासकामी विठ्ठलवाडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांपुढे एक मोठे आव्हान असताना व नमूद गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसतांना केवळ तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्याची उकल करण्यात आली. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त जय जीत सिंह, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, लक्ष्मीकांत पाटील सहा पो. आयुक्त शोध-१, सरदार पाटील, सहा. पोलीस आयुक्त शोध-२ अशोक राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, गुन्हे शाखा, घटक-४ उल्हासनगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण तसेच गुन्हे शाखा घटक-३, ४ व खंडणी विरोधी पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरी संपत फडोळ पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, महेश कवळे, कैलास इंगळे, पोहवा सुहास म्हात्रे, पोना भगवान हिवरे, पोशि तानाजी पाटील, पोशि देवेंद्र देवरे, सपोनि संजय माळी, पोहवा सचिन साळवी, पोशि शेकडे, पोशि जरक, पोहवा पोटे, पोहवा बोरकर, पोहवा कामत. पोहवा कडू, पोहवा माने, पोहवा किशोर पाटील, पोहवा रमांकात पाटील, पोना सचिन वानखेडे, पोशि चन्ने, सपोउनि केंजळे, पोहवा भावेकर, पोहवा सावंत, पोहवा काटकर, पोहवा सपकाळे पोशि शेरमाने यांनी केली.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) चे माजी प्रमुख रवी नारायण यांना ‘ईडी’ कडून अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी & सीईओ) रवी नारायण यांना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ने अटक केली आहे.

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे माजी प्रमुख रवी नारायण यांचा यात सहभाग आहे का? याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू होती. यानंतर, अखेर असे समजते की ‘ईडी’ने फोन टॅपिंग प्रकरणी रवी नारायण यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत अटक केली आहे.

‘ईडी’ने यापूर्वी कथित फोन टॅपिंग प्रकरणात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ (एनएसई) चे माजी प्रमुख आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती. या प्रकरणांचा समांतर तपास करणाऱ्या सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना ‘को-लोकेशन’ घोटाळ्यात अटक केली होती.

 

अतिवेगाने वाहन चालविल्याने गेल्या साडे तीन वर्षात ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महामार्गाने वाहन चालताना वेगावर नियंत्रण असणे अत्यावश्यक बाब असते. अनेकदा वेगवान वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्याने स्वतःसोबत इतरांचेही जीव धोक्यात घालण्याचा प्रकार घडतो परिणामी भीषण अपघात घडून मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या महामार्ग पोलिसांच्या अहवालानुसार जवळपास ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू हा ७६ हजार अपघातांमध्ये झाला असून याला सर्वस्वी जबाबदार बाब म्हणजे अतिघाईने व वेगाने वाहन चालविणे होय.

नुकतेच सायरस मिस्त्री यांचे निधन वाहन अपघातात झाले होते, तत्पूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा सुद्धा मृत्यू महामार्गावर अपघातात झाला होता. काही महामार्ग हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून मुंबई – पुणे, अहमदाबाद – मुंबई, सोलापूर – पुणे, औरंगाबाद – मुंबई यासह औरंगाबाद – अमरावती इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. इथे विशेष बाब म्हणजे काही जागी रस्ते व्यवस्थित नाही परंतु चार ते सहापदरी मार्गावर देखील अपघातांची संख्या लक्षणीय आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वेगाला आवर न घालणे होय. केवळ महामार्गावरच नाही तर शहरी हद्दीत देखील सुसाट वेगाने व कुठलीही पर्वा न करता वाहन चालविणे अनेकांच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.

वाहन चालविताना नियम न पाळणे, घाईगडबडीने वाहन चालविणे, हेल्मेटचा तसेच सिटबेल्टचा वापर न करणे, स्वतःची लाईन सोडून वाहन चालविणे, ओव्हरटेक करण्याचा आततायी प्रयत्न करणे, अवजड वाहनांच्या दरम्यान सुरक्षित अंतर न राखणे इत्यादी बाबी अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या आहे. काही अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मालाची लोडींग केलेली असते याशिवाय अतिवेग असल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतो जो स्वतःसोबत इतरांनाही हानी पोहचवतो. मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालविल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

 

डोंबिवली-कल्याण मध्ये ८ हजार ८० घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली-कल्याण शहरातील यंदा सार्वजनिक १५ व खासगी ८ हजार ८० घरगुती गणेशमूर्तीचे तर ३ हजार ४६७ गौरींचे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर‘ या जय घोषात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, निर्माल्यासाठी सर्वच ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे पर्यावरण पूरक वातावरणात गणपतीचे विसर्जन पार पडले.

डोंबिवलीमध्ये रेतीबंदर गणेश घाट, कुंभारखाण पाडा, चोळे गाव, कचोरे तलावात तर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यानजीकचा गणेश घाट, काळा तलाव, गौरी पाडा तलाव, आधारवाडी जेल तलाव याठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन पार पडले.

घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचाही व्यवस्था करण्यात आली होती. पण बऱ्याच गणपती भक्तांनी तलावात विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. गेल्या पाच दिवसांपासून डोंबिवली-कल्याण मध्ये गणरायाची भक्तिभावाने पुजा-अर्चा, भजन आणि कीर्तन यामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी गौरी गणपतींना निरोप देण्यासाठी ढोल-ताशांचा गजरात, बॅन्ड, बॅन्जो आणि डिजे च्या तालावर लाडक्या गणपती बाप्पाची भव्यदिव्य मिरवणूका काढण्यात आल्या.

या वेळी कोणताही अनुचित प्रकार आणि दुर्घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी प्रत्येक चौका चौकात आणि खाडी परिसरात कडक आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

जनतेचा कौल होता म्हणून शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“आम्ही कुणासोबत युती केली, २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. आमचं काही चुकलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली आणि जनतेचाही हाच कौल होता की, शिवसेना-भाजप युतीने सरकार स्थापन करावे. पण समीकरण बदलले, दुसरे सरकार आले, आम्ही ते दुरुस्त केले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले.

आज जनता आनंदी आहे. २०१९ मध्ये जे व्हायला हवे होते ते आम्ही आता केले. २०१९ मध्ये जे काही झाले ते कोणालाच आवडले नाही. मतदारांनी युतीला कौल दिला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आता यानंतर अनेकांनी फोन करून माझे अभिनंदन केले आहे. अनेकांनी मला सांगितले, आम्ही युतीला मतदान केले. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे असे नवनवीन प्रयोग करताना आम्हाला ते विश्वासात घ्यावे लागले. आमची मते घेऊन फसवणूक केली. त्यामुळे अनेकांनी मला सांगितले की आज आपण खूप आनंदी आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.

…म्हणून हे काम केलं नाही..

गेल्या वर्षी गणपतीला काय विनंती केली असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. “मी नेहमीच या महाराष्ट्रातील लोकांना सुखी कर. या राज्यावर कोणतेही संकट येऊ नये, असे म्हणत कोणत्याही निकालाची अपेक्षा न करता मी मेहनत करत राहिलो. मला कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, त्यामुळे मी हे काम केले नाही.” तत्पूर्वी बोलताना शिंदे म्हणाले की, दीड दिवसांच्या गणपतीमध्ये आपण किमान २५० लोकांच्या घरी भेटी दिल्या असून या भेटी अजूनही सुरूच आहेत आणि अनंत चतुर्दशी पर्यंत सुरूच राहतील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.