Home Blog Page 172

‘खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन मंत्रीच करत आहेत सरकारी पैशांची उधळपट्टी’; प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर बोचरी टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील मंत्रीच हे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सरकारच्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याची बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला. प्रवीण दरेकर म्हणाले की, मंत्र्यांकडूनच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वृत्ती आणि सरकारी पैशाची उधळपट्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित थांबवावी. ज्या मंत्र्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी हॉस्पिटलची बिलं घेऊ नयेत. मंत्र्यांनी सर्व बिलं परत करून एक चांगला पायंडा पाडावा, असे आवाहनही त्यांनी विधान परिषदेत केले.

राज्यातील लोडशेडिंगच्या प्रश्नावर ते म्हणाले की, वीज देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली राज्य सरकारने भारनियमन सुरू केले आहे. राज्याच्या बेशिस्त कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात भारनियमन केले जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात कधीही भारनियमन झाले नाही. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर ढकलायचे असे राज्य सरकारचे धोरण आहे. कोळशाचं खापर केंद्रावर फोडून काहीच होणार नाही. केंद्राकडून राज्याला अतिरिक्त कोळसा दिला जातोय. स्वतः वीजनिर्मितीबाबत राज्य सरकार बेफिकीर आहे. त्यात सर्वसामान्य जनता होरपळत आहे. शेतकऱ्यांना, ग्राहकांना वीज देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. सरकारची पूर्ण पत संपली आहे. ग्राहकांकडून महावितरणने वाढीव सुरक्षा अनामत रक्कम घेऊ नये. राज्य सरकारमध्ये कुणाचा कुणाला समन्वय नाही. अर्थमंत्री हे ऊर्जाखाते काँग्रेसकडे आहे म्हणून त्यांना निधी देत नाहीत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजप तर्फे राज्यभर आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांना सभा घेण्याचा अधिकार आहे. सभेला परवानगी द्यायची नाही, ही सरकारची दंडेलशाही आणि धोरण आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेला भाजपचे समर्थन आहे. जिथे गरज पडेल तिथे भाजपही सहभागी होईल, असे त्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले.

 

बेवारस स्थितीत आढळलेली दुचाकी कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या पोलीसांनी मालकांस हुडकून केली परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  काटाई- खोपोली द्रुतगती महामार्गावरील बदलापूर खोणी नाका या परिसरात एक दुचाकी गेल्या काही दिवसांपासून बेवारस अवस्थेत आढळून आली होती. कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या  कर्मचाऱ्यांना सदर दुचाकी आढळून आली असताना ती दुचाकी ज्या दुचाकी मालकाची आहे त्यांस हुडकून काढून शहर वाहतुक शाखा कोळसेवाडी यांच्या तर्फे संपर्क करून बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोह. पंढरीनाथ काळे, पोशि. सुनील सांगळे सोबत ट्रॅफिक वॉर्डन मनोज शिरोसे, रामचंद्र उज्जैनकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते सदर दुचाकी वाहन मालकांस सोपवण्यात आली म्हणून सदर कोळसेवाडी शहर वाहतूक शाखेच्या कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबतचा दिला अल्टिमेटम ! त्यामुळे राज्य सरकारने घेतला धसका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्याचं राजकारण चांगलाचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्याबाबत राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमची तारीख जशी जवळ येत आहे. त्यापद्धतीने राज्य सरकार तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे येत्या तीन तारखेला राज्यात कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला सतर्केचा इशारा दिला आहे. तर त्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांची देखील बैठक महासंचालक लवकरच घेणार आहे. या बैठकीत भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भात सर्व मार्गदर्शक सुचनाचे कटाक्षाने पालन करण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गृहमंंत्रालायाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहिल. त्याच पार्श्वभूमीवर अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण चर्चा बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. फक्त मुस्लिम बांधवांसाठी नव्हे, तर सर्व धार्मियांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावताना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी येत्या ३ तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. जर मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत. तर त्या पुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जाणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

 

चार राज्यांमधील पाच पोट निवडणुकांमध्ये भाजपाचा कुठेही विजय नाही !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पश्चिम बंगालमधील आसनसोल ही लोकसभा तसेच पश्चिम बंगालमधील बालीगंगे, छत्तीसगडमधील खैरागड, बिहारमधील बोचाहान आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर या चार विधानसभा जागांचे निकाल हाती आले आहेत. १२ एप्रिल रोजी चार राज्यांतील ५ जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान करण्यात आले होते.

बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाची निराशा झाली आहे. बिहारमधील बोचाहान मतदारसंघात आरजेडी ने दणदणीत विजय मिळवला आहे. याशिवाय छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय झालेला आहे. बंगालमध्येही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने निर्णायक विजयाकडे वाटचाल केली आहे.

तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार तृणमूल काँग्रेस खूप पुढे आहे. आसनसोलमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार ३.७ लाख मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी भाजप सोडून तृणमूलमध्ये दाखल झालेले बाबुल सुप्रियो बालीगंगे विधानसभा मतदारसंघात पुढे आहेत. दुसरीकडे, शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

बोचन विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे अमर पासवान विजयी

बिहारमधील बोचन विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा ३६,५६३ मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला फायदा झाला

खैरागड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या यशोदा वर्मा विजयी झाल्या आहेत. २१ व्या आणि अंतिम फेरीत काँग्रेसने २० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. भाजपाच्या कोमल जंगले यांचा काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी पराभव केला आहे.

कोल्हापूर आघाडीचं ! जयश्री जाधवांचा मोठा विजय!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना मिळाला आहे. हा कौलही खूप चांगल्या फरकाने आहे. कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या जयश्री जाधवांना ९६ हजार २२६ मते तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ हजार ६४४ मतांनी जयश्री जाधव विजय मिळविला आहे. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मतांच्या टक्केवारीच्या हिशेबात आघाडीला ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मते तर भाजपाला ४३ टक्के मते मिळाली आहेत.

६४ सहकारी बँकांसह ८ मोठ्या बँकाही बुडाल्या! केरळसह पंजाब आणि महाराष्ट्र संकटात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बऱ्याचदा बँका आर्थिक गैरव्यवहारांमुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे बंद पडतात. मात्र, २०१७ पासून तब्बल नागरी सहकारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँका बंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या बँका बंद पडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकत्र या बँकांचा विलीनीकरण केलं गेलं किंवा आरबीआय (RBI) ने या बँकांचे परवाने बंद केले.

महत्वाची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेल्या एनपीओमुळे जायबंदी झाली ज्यामुळे आठ मोठ्या बँकांचे देखील विलीनीकरण करण्यात आले. आर्थिक क्षेत्रात सहकारी क्षेत्राने चांगली कामगिरी बजावली. मात्र, मार्च २०२० अखेरीस शेड्युल बँकांच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेचा आकार १०% इतकाच राहिला.

एनपीए आणि कमी गुंतवणुकीचा बँकांना फटका

सध्या नागरी सहकारी बँकांना वाढलेला एनपीए तसेच दिवसेंदिवस कमी होत असलेली गुंतवणूक याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ४,८०६ कोटी रुपयांचा तोटा एकत्रितपणे नागरी सहकारी बँकांना बसला होता. सहकारी बँकांना २०१९ मध्ये ३,५४४ कोटी रुपये इतका नफा झाला होता.

३१ डिसेंबर २०२१ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण एनपीए (NPA) ५.६० लाख कोटी रुपये इतके होते असं सरकारने मान्य केलं आहे. आपला अहवाल आकर्षित करण्यासाठी बँकांनी त्यांच्या अंतर्गत हिशोब ठेवण्याच्या पद्धतीत बँकांनी केलेला बदल म्हणजे कर्ज निर्लेखन. अशा कर्ज निर्लेखनाच्या आधारे कर्ज वेगळे केले तरी त्यावरील वसुलीची कारवाई चालूच राहते. केंद्र सरकारने सहकारी बँकांचे निर्णय कठोर करत त्यांना आरबीआयच्या कक्षेत आणले. सार्वजनिक बँकांनी बुडीत केलेले कर्जाचे राईट – १.३१ लाख कोटी असा आहे.