Home Blog Page 18

*आश्रमशाळेत महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी.*

अहमदपूर :-
मासूम शेख

तालुक्यातील सांगवीतांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी
साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा गोरगे तर याप्रसंगी विनोद गुंठे,विलास पडिले, स्वाती कदम,नागनाथ जवणे,रामचंद्र बाबळसरे, विद्युलत्ता घोगरे
आदींची उपस्थिती होती.
उपस्थितांपैकी नरसिंग सांगवीकर विलास पडिले,पंकज आडे,नागनाथ जवणे,स्वाती कदम, लक्ष्मी राजगे यासह बालचिमुकल्यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज नरवटे,अजय मिटकरे,शरद राठोड,अक्षय फुले,बबीता यादव,ज्ञानोबा व्हटमुर्गे,सचिन येचाळे,सिद्धेश्वर राठोड, सुनिता राठोड,सोनू शेळके आदिनी परिश्रम घेतले.

*जगाला गांधी विचारांची आवश्यकता* प्रा बालाजी आचार्य यांचे प्रतिपादन

अहमदपूर:-
मासूम शेख

महात्मा गांधीजींचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अतुलनीय होते त्यांची सत्य व अहिंसा हा विचार जागतिक शांततेसाठी , मानवता आणि सामाजिक न्यायासाठी उपयुक्त आहेत आजचे जग हे हिंसाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार यांच्यात अडकले आहे यातून बाहेर पडायचे असेल तर जगाला गांधी विचारांशिवाय दुसरा मार्ग नाही त्याच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन विचारवंत प्रा बालाजी आचार्य यांनी बुधवारी ता २ आक्टोबर रोजी अहमदपूर येथील लोकराजा अध्यापक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात केले
या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश तुरेवाले होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य ,प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक बालाजी गुळवे , सहशिक्षक गौतम कांबळे, सहशिक्षीका शिवकांता शिंदे प्रा भुजंगराव पाटिल आदि उपस्थित होते यावेळी मान्यवराच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर छात्र अध्यापिका कु साक्षी मोरे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले
यावेळी छात्र अध्यापक विद्यार्थी विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना प्रा आचार्य पुढे म्हणाले की गांधीजीच्या विचारांचा अवलंब केल्यास देशात राष्ट्रधर्म वाढीस लागेल, धर्माधर्मातील कलह मिटतील व सर्व समाज गुण्या गोविंदाने नांदू शकेल आणि मानवी जीवन सुरक्षित शांतता पूर्ण सुखी समाधानी व परिपूर्ण होईल म्हणून भविष्यातील चांगल्या जगासाठी गाधी विचारांची आवश्यकता आहे राष्ट्रातील सर्वच प्रश्नावर गांधीवाद हाच आशावाद असू शकतो त्यासाठी युवा पिढी, विवेकी आणि बुद्धीवादी लोकामध्ये चर्चा झाली पाहिजे अशी ही भूमिका मांडली या कार्यक्रमात तत्पूर्वी शिवकांता शिंदे , गौतम कांबळे बालाजी गुळवे यांनी हि समायोचित विचार व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य रमेश तुरेवाले करताना म्हणाले की अहमदपूर शहरात नव्याने सुरू केलेल्या अध्यापक विद्यालयाला चागला प्रतिसाद मिळाला आणि वैचारिक दृष्टिकोनातून जयंती उत्कृष्ठ साजरी झाल्याने खूप आनंद झाला भविष्यात आदर्श समाज निर्मिती साठी कटिबद्ध राहू अशी शपथ घेतली या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन छात्र अध्यापिका कु आयोध्या नरवटे , भाग्यश्री भैयरवाड हिने केले तर शेवटी आभार कु अदित्य गुळवे यांने मांडले कार्यक्रमाला छात्र अध्यापक- अध्यापिका, सहशिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती

*अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात-* *’उच्चशिक्षणातील *संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता संधी* *आणि आव्हाने’ वर राष्ट्रीय* *चर्चासत्राचे आयोजन*

*अहमदपूर:-*
*मासूम शेख*

     येथील महात्मा फुले महाविद्यालयात उच्च शिक्षण आणि संशोधनात सर्जनशील कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी आणि आव्हाने अर्थात ‘जनरेटिव्ह ए आय इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च :  अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस’ म्हणजेच ‘उच्च शिक्षण आणि संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता संधी आणि आव्हाने ‘या  विषयावर  दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय आंतर विद्याशाखीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक व शिक्षण तज्ज्ञ तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ऑक्टोबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ‘उच्च शिक्षण आणि संशोधनात सृजनशील कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी आणि आव्हाने’ अर्थात ‘जनरेटिव्ह ए.आय. इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च : अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस’ या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे राहणार असून, उद्घाटक म्हणून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार आहेत तर बीज भाषक म्हणून हैदराबाद, तेलंगणा येथील एम. व्ही. एस. आर. महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. राजेश कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. शिंदे व चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे उपाध्यक्ष माधवराव पाटील हे अध्यक्षस्थान भूषवणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. दिगंबर नेटके उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता डॉ. पराग खडके, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य डी. आर. झोडगे, चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रास देशभरातून अभ्यासक, संशोधक उपस्थित राहणार असून, परिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासकांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आय. क्यु. ए.सी. समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, नॅक समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार, चर्चासत्राचे समन्वयक डॉ. बब्रुवान मोरे,  सहसमन्वयक डॉ. सतीश ससाणे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी केले आहे.

*शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश*

अहमदपूर :-
मासूम शेख

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (म.रा.), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने दि.6 आँगस्ट ते 31 सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सहा गट देण्यात आलेले होते.यात तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तर असे शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओ निर्मितीचा नुकतेच निकाल घोषित करण्यात आला आहे.यात यशवंत विद्यालयातील दोन शिक्षकांनी भरीव यश संपादन केले आहे.
यशवंत विद्यालय अहमदपूर जि.लातूर येथिल उपक्रमशील कलाशिक्षक महादेव खळुरे यांना 9-10 या गटातून सामाजिक शास्त्र विषयातील जिल्हातील द्वितीय पुरस्कार जाहिर झाला आहे. उपक्रमशील सहशिक्षक रामलिंग दत्तापूर यांना 9-10 वी गटातील भाषा विषयात अहमदपूर तालुक्यातील सर्वप्रथम लातूर जिल्ह्यातून सर्व तृतीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
यशाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,उपसचिव डॉ.सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक शिवाजी सूर्यवंशी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूनी अभिनंदन केले.

*माहिती अधिकार दिनाची जनजागृती व्हावी.* *पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांचे प्रतिपादन*

*अहमदपूर :-*
*मासूम शेख*

माहिती कायद्याची आमलबजावणी प्रथमता स्वीडनमध्ये 1766 साली झाली. त्यानंतर सबंध जगामध्ये भारत हा माहिती चा कायदा लागू करणारा  54 वा देश असल्याचे सांगून या माहितीच्या अधिकारामुळे देश आणि राज्यातील कामे अत्यंत पारदर्शी होऊन त्यात शासनाच्या महसूलाची मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासन अधिक पारदर्शी होण्यासाठी माहितीच्या अधिकारा ची जनजागृती व्हावी असे आग्रही प्रतिपादन यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी केले.
ते दि 28 सप्टेंबर रोजी आयोजित  राज्य परिवहन आगारात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख अमर पाटील, व्यासपीठावर प्रमुख अतिथी  म्हणून वाहतूक निरीक्षक भरत केदासे,वरीष्ट लिपिक योगेश भंगारे, हेड मेकॅनिक व्यंकट ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना राम तत्तापूरे म्हणाले की, माहितीचा अधिकार भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केला नसला तरी कलम 91( 1)(अ) अन्वये अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करतो असे त्यांनी सांगितले.
सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप आगार व्यवस्थापक अमर पाटील यांच्या भाषणाने झाला.
कार्यक्रमाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला.
सूत्रसंचालन योगेश भंगारे यांनी तर आभार व्यंकट ठाकूर यांनी मांनले.
या सोहळ्याला राज्य परिवहन आगारातील कर्मचारी मेकॅनिक आणि प्रवासी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य परिवहन आगारातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.