Home Blog Page 25

इडली चटणी सांबार विक्रीच्या व्यवसायातून तरुणांना रोजगाराची संधी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

इडली चटणी सांबार सारखे पौष्टिक अन्नपदार्थ स्वस्त दरात विकून आर्थिक उत्पत्ती होऊ शकते आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो हे डोंबिवलीतील एका तरुणाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सकस – दर्जेदार अन्न स्वस्त दरात मिळावे आणि तरुणांना रोजगार मिळावा याकरीता ‘नादब्रह्म इडली विक्री सेवा’ व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. नादब्रह्म हे नाव आता डोंबिवली येथे दर्जेदार आरोग्यदायी इडली चटणी सांबार साठी ओळखले जाणार आहे. डोंबिवली येथे पहिल्यांदा अवघ्या दहा रुपयांत हि सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील खवय्यांची मनं आणि ह्रदय जिंकल्यावर डोंबिवली पूर्व, रामनगर मधील स्वामी समर्थ मठासमोर नादब्रह्म इडली आउटलेट योगेश कोठावदे यांनी सुरु केले आहे. या आऊटलेटचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती आणि महाराष्ट्र युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. या वेळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष अर्जुन माने, सुप्रसिद्ध गायक शेखर गायकवाड, आरती कोठावदे आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

 

डोंबिवली मानपाडा पोलीसांनी ठाणे, नवी मुंबई व मुंबई येथील १८ गुन्ह्यांची एकूण रुपये २०,१५००/- उकल करत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री.सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिलेल्या होत्या.

​ त्याप्रमाणे मानपाडा पोलीस ठाण्याचे श्री.सुरेश मदने, पोनि. (प्रशासन) अतिरिक्त कार्यभार व पोनि यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विषेश पथक स्थापन करून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मार्गदर्शन करून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपी येण्या-जाण्याचे मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करून तसेच गोपनिय बातमीदाराच्या आधारे अहोरात्र मेहनत घेवून सराईत गुन्हेगार नामे युसुफ रशीद शेख (वय: ३८ वर्ष), व नौशाद मुश्ताक आलम उर्फ सागर (वय:२८ वर्ष), यांना ताब्यात घेवून त्यांना मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. ४३४/२०२३, भादंवि कलम ४५४,३८०,३४ या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडुन ठाणे शहर, नवीमुंबई व मुबई आयुक्तालयतील १८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदर अटक आरोपींकडुन २०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, २,२०,५००/- रूपये रोख रक्कम, ०२ मोटार सायकल, ०२ लॅपटॉप, ०८ मोबाईल, ०५ मनगटी घडयाळ, ०१ कॅमेरा, ०१ स्पिकर, ०१ एटीएम कार्ड, ०१ नंबर प्लेट, ०१ हेल्मेट, घडफोडी करण्याकरीता वापरलेले दोन लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पकड, व चाकू असा एकुण २०,१५,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

अटक केलेले दोघे आरोपी हे अट्टल तसेच सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तलयात आरोपी युसूफ शेख याला एकुण २३ गुन्ह्यात व आरोपी नौशाद आलम याला एकुण ११ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्षनाखाली श्री. सुरेश मदने,पोनि(प्रशासन)अतिरिक्त.कार्भार व पोनि, सपोनि.सुनिल तारमाळे, सपोनि. अविनाश वणवे, सपोनि. प्रशांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, सोमनाथ टीकेकर, पोना. गणेश भोईर, शांताराम कसबे, प्रविण किनरे, देवा पवार, येलप्पा पाटील, अनिल घुगे, पोशि. विजय आव्हाड, अशोक आहेर, महेंद्र मंजा, संदीप चौधर यांच्या पथकाने यशस्वीरित्या केलेली आहे.

 

 

मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना ईडीची नोटीस?

मुंबई, प्रतिनिधी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांशी संबंधित असलेले कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.

ज्या आरोपी विकासकांना ULC कायद्यांतर्गत आपली जास्तीची जमीन सरकारकडे सोपवायची होती किंवा कायद्याच्या कलम 20 अंतर्गत राज्य प्राधिकरणांकडून सूट मिळवायची होती, त्यांनी लोकांची आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करून आणि खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यावधीचा घोटाळा केला आहे.

या प्रकरणात ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये घोटाळा शोधून काढल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली होती ज्यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कमाल नागरी जमीन नियमन कायदा (ULCR) कायद्याचे उल्लंघन करून, लाच देऊन आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून अतिरिक्त जमीन सरकारला हस्तांतरित न करता त्या जमिनी परस्पर विकल्या होत्या. मिरा-भाईंदरचे प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांना अर्बन लँड सीलिंग रेग्युलेशन (यूएलसीआर) कायदा प्रकरणातील 11.14 कोटी रुपयांची मनी लौंड्रींग प्रकरणाशी संबंधित माहिती आणि स्पष्टीकरण देण्यासाठी अमलबजावणी संचालयाकडून नोटीस काढून बोलावण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप ढोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय असून ते वस्तू व सेवा कर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत असताना, शिंदे राज्यात नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांची नगरविकास मंत्रालयात स्वीय्य सहाय्यक पदावर बदली करण्यात आली. नगरविकास विभागाचे मंत्री असतानाच एकनाथ शिंदे यांनी 2020 मध्ये ढोले यांची मिरा-भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतर 2021 मध्ये त्यांना महापालिका आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे:
मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक विकासकांनी महापालिका अधिकार्‍यांशी संगनमत करून अर्बन लँड सिलिंग रेग्युलेशन ऍक्ट (ULC) कायद्यानुसार अतिरिक्त असलेली जमीन सरकारला हस्तांतरित न करता त्या जमिनी परस्पर विकल्या आणि हे 2016 च्या नंतर देखील झाले आहे असे तपासात उघड झाले आहे.

दिलीप ढोले यांनी मार्च 2021 मध्ये पालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या एक वर्षाच्या पूर्वी ते अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी कमाल जमीन मर्यादा विभागाचा घोटाळा उघडकीस आणून मिरा-भाईंदर शहरातील काही विकासकांना अटक केली होती. या घोटाळ्यातील सहभागाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी वास्तुविशारद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ULC विभागातील काही तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर आणि ULC महामंडळाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला होता.

काय आहे नागरी कमाल जमीन धारणा कायदा?:
नागरी कमाल जमीन धारणा कायदा ULC अंतर्गत कोणत्याही भूखंडावर बांधकाम करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 5% जमीन सरकारला हस्तांतरित करणे बंधनकारक असते. या कायद्यातील तरतुदी पासून सूट मिळविण्यासाठी मिरा भाईंदर शहरातील काही आरोपी विकासकांनी बोगस प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या चौकशीत सुमारे २३,३४० चौरस मीटर इतकी जमीनीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

जून 2021 मध्ये, ULC प्रकरणाच्या तपासादरम्यान ठाणे पोलिसांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) मीरा-भाईंदरचे माजी नगर नियोजक आणि आर्किटेक्टसह तीन जणांना अटक केली होती.

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्याशी संपर्क केला असता कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उमेदवार निवड प्रक्रियेत अनागोंदी कारभार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत जाहिरात क्र. ०१/२०२२ अन्वये ‘असि. पब्लीक प्रॉसिक्यूटर गट अ’ ची लेखी परीक्षा दि. १९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली हाती. सदर परीक्षेचा कट ऑफ निकाल लावून दि. ०३/०३/२०२३ रोजी मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली. त्यानंतर दिनांक २३/०५/२०२३ ते ०६/०७/२०२३ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या व दिनांक २१/०७/२०२३ रोजी जनरल मेरीट लिस्ट प्रसारीत करण्यात आली.

सदर जनरल मेरीट लिस्ट मध्ये असे निदर्शनास आले की,
१) आयोगाने मुलाखतीस पात्र करण्यासाठी लावलेल्या कट ऑफ पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना देखील मुलाखतीस बोलावले. त्याबाबत पात्र उमेदवाराना कोणतीही माहिती दिली नाही.
२) आयोगाने जाहिरात प्रसिध्द करताना दिलेली स्वत: ची नियमावली पाळलेली नाही. जनरल मेरीट लिस्ट प्रसारीत करताना लेखी व मुलाखती गुण एकत्रित न करता, मुलाखतीत २१ गुण न मिळवलेल्या उमेदवारांना अपात्र केले.
३) जनरल मेरीट लिस्ट प्रमाणे आयोगाने लेखी परीक्षेत २०० मार्कपैकी ६, ८, ११, १६, १८, २१ गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये ४१ टक्के पेक्षा जास्त गुण देवुन त्यांचा ‘Eligible’ यादीत समावेश केला आहे. परंतु लेखी परीक्षेत १००, १२०, १२१, १२४, १२६, १२७ असे गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये ४१ टक्के पेक्षा कमी गुण देवुन त्यांना ‘Not Eligible’ यादीत समाविष्ठ केले असल्याने सदर उमेदवारांवर हा अन्याय आहे.
४) आयोगाने लेखी परीक्षेत २०० मार्कपैकी ६, ८, ११, १६, १८, २१ गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखती करीता का बोलावले गेले ? याबाबत अद्याप स्पष्ट केलेले नाही.
५) आयोगाने लेखी परीक्षा घेवुन देखील त्यास काहीही महत्व न देता उमेदवारांची निवड मुलाखतीत ४१ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवण्याची अट ठेवुन निवड प्रक्रिया सदोष ठरवली आहे.

नमुद अन्यायग्रस्त ६३ उमेदवारांनी एकत्रित येवुन सदर निवड प्रक्रियेस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे आव्हान दिले आहे.

 

मनोहर भिडेनी महात्मा गांधी बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन!

मनोहर भिडेला अटक करण्याची केली मागणी !

भाईंदर, प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्द्ल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मीरा भाईंदर काँग्रेस तर्फे गोडदेव नाका येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, महिला, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर भिडे नावाची व्यक्ती विविध प्रकारे आक्षेपार्ह विधाने करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना देशाचे स्वातंत्र्य मान्य नाही, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, महापुरुषांचा त्याग, बलिदान मान्य नाही, जो व्यक्ती कोट्यावधी लोकांची श्रद्धा असलेले साईबाबांच्या संदर्भात गरळ ओकतो, देशाचे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतो.

महिला पत्रकाराचा अपमान, माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुले होतात अशी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू भिडेंला अटक का केली जात नाही? असा सवाल आंदोलन दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, अनिल सावंत, प्रकाश नागणे, राकेश राजपुरोहित, सुरेश मिश्रा, सिद्धेश राणे, हेमांगी पाटील, सुशन शेट्टी आदी वक्त्यांनी करीत भिडेंला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर नवघर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.