Home Blog Page 25

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा उमेदवार निवड प्रक्रियेत अनागोंदी कारभार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत जाहिरात क्र. ०१/२०२२ अन्वये ‘असि. पब्लीक प्रॉसिक्यूटर गट अ’ ची लेखी परीक्षा दि. १९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली हाती. सदर परीक्षेचा कट ऑफ निकाल लावून दि. ०३/०३/२०२३ रोजी मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली. त्यानंतर दिनांक २३/०५/२०२३ ते ०६/०७/२०२३ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या व दिनांक २१/०७/२०२३ रोजी जनरल मेरीट लिस्ट प्रसारीत करण्यात आली.

सदर जनरल मेरीट लिस्ट मध्ये असे निदर्शनास आले की,
१) आयोगाने मुलाखतीस पात्र करण्यासाठी लावलेल्या कट ऑफ पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना देखील मुलाखतीस बोलावले. त्याबाबत पात्र उमेदवाराना कोणतीही माहिती दिली नाही.
२) आयोगाने जाहिरात प्रसिध्द करताना दिलेली स्वत: ची नियमावली पाळलेली नाही. जनरल मेरीट लिस्ट प्रसारीत करताना लेखी व मुलाखती गुण एकत्रित न करता, मुलाखतीत २१ गुण न मिळवलेल्या उमेदवारांना अपात्र केले.
३) जनरल मेरीट लिस्ट प्रमाणे आयोगाने लेखी परीक्षेत २०० मार्कपैकी ६, ८, ११, १६, १८, २१ गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये ४१ टक्के पेक्षा जास्त गुण देवुन त्यांचा ‘Eligible’ यादीत समावेश केला आहे. परंतु लेखी परीक्षेत १००, १२०, १२१, १२४, १२६, १२७ असे गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये ४१ टक्के पेक्षा कमी गुण देवुन त्यांना ‘Not Eligible’ यादीत समाविष्ठ केले असल्याने सदर उमेदवारांवर हा अन्याय आहे.
४) आयोगाने लेखी परीक्षेत २०० मार्कपैकी ६, ८, ११, १६, १८, २१ गुण मिळवलेल्या उमेदवारांना मुलाखती करीता का बोलावले गेले ? याबाबत अद्याप स्पष्ट केलेले नाही.
५) आयोगाने लेखी परीक्षा घेवुन देखील त्यास काहीही महत्व न देता उमेदवारांची निवड मुलाखतीत ४१ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवण्याची अट ठेवुन निवड प्रक्रिया सदोष ठरवली आहे.

नमुद अन्यायग्रस्त ६३ उमेदवारांनी एकत्रित येवुन सदर निवड प्रक्रियेस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे आव्हान दिले आहे.

 

मनोहर भिडेनी महात्मा गांधी बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन!

मनोहर भिडेला अटक करण्याची केली मागणी !

भाईंदर, प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्द्ल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मीरा भाईंदर काँग्रेस तर्फे गोडदेव नाका येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, महिला, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर भिडे नावाची व्यक्ती विविध प्रकारे आक्षेपार्ह विधाने करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना देशाचे स्वातंत्र्य मान्य नाही, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, महापुरुषांचा त्याग, बलिदान मान्य नाही, जो व्यक्ती कोट्यावधी लोकांची श्रद्धा असलेले साईबाबांच्या संदर्भात गरळ ओकतो, देशाचे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतो.

महिला पत्रकाराचा अपमान, माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुले होतात अशी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू भिडेंला अटक का केली जात नाही? असा सवाल आंदोलन दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, अनिल सावंत, प्रकाश नागणे, राकेश राजपुरोहित, सुरेश मिश्रा, सिद्धेश राणे, हेमांगी पाटील, सुशन शेट्टी आदी वक्त्यांनी करीत भिडेंला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर नवघर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

‘डोंबिवली डायमंड्स रोटरी क्लब’च्या वतीने नामवंत पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड गणेश मंदिर संस्थान येथील वरद सभागृह येथे डोंबिवलीतील नामवंत पत्रकारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘दै. प्रहार’ चे जेष्ठ पत्रकार बापु वैद्य, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक तसेच साप्ताहिक ‘न्याय रणभूमी’, ‘अंतिम न्याय’ व ‘लोकहीत न्यूज’ चे धडाडीचे राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार अवधुत सावंत, साप्ताहिक ‘आपला भगवा’,’राजमुद्रा’ च्या संपादिका सारिका शिंदे, ‘डोंबिवली फास्ट न्यूज’ चे किशोर पगारे, ‘दै. लोकमत’ चे प्रशांत माने, ‘पुढारी ऑनलाईन’ च्या भाग्यश्री प्रधान आचार्य, ‘आज तक’ चे मिथीलेश गुप्ता, ‘तरुण भारत ऑनलाईन’ च्या जान्हवी मौर्य, ‘क्राईम बॉर्डर’ चे संपादक राजेंद्र वखरे, ‘दै.मुंबई चौफेर’ व ‘वृत्तमनास’ चे श्रीराम कांदू व दै. लोकसत्ता’ चे भगवान मंडलिक या सर्व पत्रकारांचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी किशोर पगारे, सारिका शिंदे, भाग्यश्री प्रधान आचार्य, राजेंद्र वखरे या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले .

त्याचबरोबर सतत पडणाऱ्या पावसातही आपल्याला सकाळी वेळेवर वर्तमानपत्र पोहचविणार्‍या मुलांना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ तर्फे रेनकोट देण्यात आले. तसेच पावसाळ्यात भर पावसातही प्लास्टिक कागदाच्या आडोशाने भाज्यांचा बचाव करत आपल्याला ताज्या भाज्या उपलब्ध करून देणाऱ्या काही गरजू भाजी विक्रेत्यांना क्लब तर्फे मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी यांनी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थितांसमोर दिली. क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले यांनी जागरूक समाज घडविण्याच्या पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांच्या निरपेक्ष कार्याची स्तुती करत कौतुक केले व असेच कार्य निरंतर करत राहण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ च्या वतीने शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले, मानद सचिव रोटेरियन जगदिश तांबट , क्लबचे संस्थापक रोटेरियन राजेश कदम, रोटेरियन संजय टेंभे, प्रकल्प प्रमुख रोटेरियन मनोज क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख रोटेरियन सुदिप साळवी, रोटेरियन साधना साळवी, रोटेरियन उमेश स्थुल उपस्थित होते.

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींवर दाखल केला 498A अंतर्गत खोटा गुन्हा दाखल!

लातूर, प्रतिनिधी: भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेऊन भारत देशाच्या प्रत्येक थरातील नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने देशात अनेक कायदे व नियम बनविले जातात परंतु पुढे जाऊन त्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळत आहेत. हुंडाबळी आणि महिलांवरील घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करणारी अशीच घटना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडलेली आहे. एक वर्षांपूर्वी स्वतःच्या मानमर्जीने घटस्फोट घेतलेल्या एका मुस्लिम महिलेने आपल्या वडिल्यांच्या मदतीने आकसाने सासरच्या पाच लोकांवर हुंडा मागून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीनुसार किनगाव पोलीस ठाण्यात कलम 498A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणाची हकीगत अशी आहे कि, अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील मूळची राहणारी अफसाना अल्ताफ शेख नावाच्या महिलेचे 2018 साली मौजे खडी, तालुका पालम, जिल्हा परभणी या गावातील अल्ताफ शेख नावाच्या तरुणाशी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे नातेवाईक-मित्रमंडीळीच्या साक्षीने लग्न झाले. काही काळ त्यांचा संसार सुखाने चालू असताना त्या दाम्पत्याला एक गोंडस मुलगा जन्माला आला. त्यानंतर हि महिला आपल्या सासरच्या गावी मौजे खडी येथे सासू सैयदा आणि सासरा अजीज शेख यांच्या सोबत राहू लागली. नवरा अल्ताफ याने आपल्या उदरनिर्वाहासाठी मारुती डिजायर गाडी खरेदी करून ती भाड्याने चालवू लागला. गाडी भाड्याने चालवीत असताना त्याला सतत दोन-दोन तीन -तीन दिवस बाहेर गावी जावे लागत असे तर सासू-सासरे दिवसभर आपल्या शेताच्या कामानिमित्ताने शेतातच राहत होते.

अशा वेळी अफसाना नावाची हि महिला घरात लहान मुलासोबत एकटीच राहत असे. असे असताना अफसाना हिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि गेले अनेक दिवसांपासून त्यांचे अनैतिक संबंध चालू होते. दोन-तीन दिवसांनी जेव्हा तिचा नवरा अल्ताफ बाहेरून घरी येत असे तेव्हा ती नवऱ्याशी नीट वागत नव्हती, नवऱ्याकडे जास्त लक्ष देत नव्हती तेव्हा नवऱ्याला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला आणि म्हणून नवऱ्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी त्या अफसाना नावाच्या महिलेला गावातील तरुणासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर अफसाना हिने रागाच्या भरात बोलली कि “तू मला शारीरिक सुख देऊ शकत नाही! मला तुझ्यासोबत राहायचे नाही तू मला घटस्फोट दे” असे सांगितले.

घडलेल्या ह्या सर्व प्रकारानंतर गावात माझी बदनामी झाली म्हणून अल्ताफ हा निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गावातील काही लोकांनी वेळीच त्याला पकडून त्याची समजूत काढली आणि त्या दोघात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील अफसाना नावाची ती महिला नवऱ्यासोबत राहायला तयार झाली नाही. एव्हढेच काय तर त्यावेळी तिच्या वडिलांनी देखील तिला घरात घेण्यास नकार दिला होता. “तुम्हाला काय करायचे ते करा! आता ती आमच्यासाठी मेली आहे” असे तिचे वडील त्यावेळी बोलत होते.

काही दिवसानंतर तिने नवऱ्याला सोबत घेऊन जाऊन मुस्लिम धर्मियांचे शरीरयत कोर्ट ‘दारुल कझा’ नांदेड येथे गेली आणि तिथे स्वखुषीने ‘खुलनामा’ लिहून देऊन घटस्फोट घेतला. त्यानंतर नांदेड येथेच कोर्टात जाऊन एक शपथपत्र देखील लिहून दिले आणि त्या शपथपत्रात तिने मान्य केले आहे कि तिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध जुळले असून तिला नवऱ्यासोबत राहायचे नाही म्हणून ती स्वखुशीने घटस्फोट घेत आहे. तिला तिचा मुलगा जैद हा देखील नको आहे आणि काहीहि पोटगी, नुकसान भरपाई देखील नको आहे. त्याच बरोबर तिला सासरच्या कोणत्याही लोकांवर काही आक्षेप नाहीत किंवा काही तक्रार नाही आणि भविष्यात ती सासरच्या लोकांवर कोणत्याही पोलीस ठाण्यात कलम 498 नुसार किंवा हुंडाबळीची तक्रार करणार नाही असे शपथपत्रात लिहून दिले आहे.

अशी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यानंतर ह्या महिलेने तिचे वडील मगदूम शेख यांच्या बळजबरीने सांगण्यावरून अहमदपूर येथील महिला तक्रार निवारण केंद्रात जाऊन सासरच्या लोकांविरोधात खोटी तक्रार केली. तेथे सुनावणी झाली असता सासरच्या लोकांनी सदरची संपूर्ण घटना संस्थेच्या लोकांना सांगितली आणि त्या तक्रारदार महिलेने स्वतःच्या मर्जीने घटस्फोट घेतला असल्याची सर्व कागदपत्रं दाखविले. महिला तक्रार निवारण केंद्रातील लोकांनी देखील नवरा-बायको दोघात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा समेट झाला नाही.

त्यानंतर काही महिन्यांनी त्या महिलेचे वडील मगदूम शेख यांनी किनगाव पोलीस ठाण्यात नवरा अल्ताफ शेख, सासू सैयदा शेख, सासरा अजीज शेख, मोठा दीर अहमद शेख आणि नणंद शमीम शेख यांचे विरुद्ध खोटी तक्रार दिली असून त्या तक्रारीत पाच तोळे सोने, चार लाख रुपये रोख आणि संसार उपयोगी वस्तू दिल्याची खोटी माहिती दिली आहे. एव्हढेच नव्हे तर सासरच्या लोकांनी जेसीबी घेण्यासाठी दहा लाख रुपये हुंडा मागितल्याची खोटी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद क्र. 0162/2023 नुसार किनगांव पोलिसांनी सासरच्या पाच लोकांवर कलम 498, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

या प्रकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे लग्नाच्या तब्बल पाच वर्षांनी हुंडा मागितल्याची खोटी तक्रार करण्यात आलेली आहे. तक्रारदार महिलेने आधी स्वतःहून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर जवळपास एक वर्षाने हि तक्रार केली आहे. त्याच बरोबर त्या महिलेची नणंद शमीम शेख हि मुंबईला राहत आहे तिचा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरी देखील तिला त्रास देण्याच्या उद्देशाने तिचे देखील नाव तक्रारीत टाकले आहे. त्यामुळे त्या महिलेने सासरच्या लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांचे कडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा उद्देशानेच हि खोटी तक्रार केली असल्याचे बोलले जात आहे. एव्हढेच नव्हे तर किनगाव येथील काही बोगस पत्रकारांना हाताशी धरून तश्या बातम्या करून या प्रकरणात सासरच्या लोकांची खोटी बदनामी करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

याबाबत सासरच्या लोकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला असून याबाबत लवकरच त्या अफसाना शेख, तिचे वडील आणि या प्रकरणात सामील असलेले बोगस पत्रकार यांच्या विरोधात लातूरचे पोलीस अधीक्षक सोबतच राज्याचे मुखमंत्री आणि राज्य मानवी हक्क आयोग यांचेकडे रीतसर तक्रार करून दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी देशात अनेक प्रभावी नियम व कायदे अमलांत आणले गेले आहेत. काही प्रकरणात महिलांना न्याय मिळावा हा त्यामागचा शुद्ध उद्देश्य असला तरी मात्र आता या कायद्याचा दुरुपयोगच जास्त केला जात असल्याचे दिसत असून अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे” असे निरीक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली आपल्या एका निरीक्षणात नमूद केले आहे. ह्या प्रकरणात देखील महिलेने केलेली तक्रार खोटी निष्पन्न झाल्यावर किनगाव पोलीस अफसाना नावाच्या त्या महिलेवर आणि तिचे वडील मगदूम शेख यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार पुण्यातील घटनेनंतर गुन्हेगारांवर भयानक संतापले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील घटनेत प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तरुणीही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी वाचवा… वाचवा… असा आक्रोश करुन भररस्त्यात धावत होती. त्याचवेळी, एक युवक जीवाची बाजी लावून पुढे सरसावला आणि आणखी एका तरुणाच्या मदतीने तरुणीचा जीव वाचला. या घटनेनं पुणे शहरासह महाराष्ट्र हादरला आहे. त्यावरुन, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आहे. गृहमंत्र्यांना वेळ नाही का? असा सवाल करत अजित पवार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र सध्या दिसत आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळायला वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे शहर इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही, अशा शब्दात अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असंही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हटलं.