Home Blog Page 46

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही समिती करणार!

नवी दिल्ली, प्रतिनिधी: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या (EC) नियुक्तीसाठी कॉलेजियम सारखी यंत्रणा निर्माण करण्याच्या मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे.

न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले आहे की, देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती निवड करेल. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त. मात्र त्यांच्या नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतींकडेच राहतील.

न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांचा या खंडपीठात समावेश आहे. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी खंडपीठाने या मुद्द्यावर आपला निकाल राखून ठेवला होता. या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, निवडणूक आयोगाने कायद्याच्या चौकटीत राहून स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे, घटनेच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे.

अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीबाबत न्यायालयाने मूळ रेकॉर्ड मागवले होते. अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक कशी झाली, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला होता. केवळ यंत्रणा समजून घ्यायची आहे, असे खंडपीठाने म्हटले होते.

आतापर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी झाली?

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती करतात. या शिफारशीला राष्ट्रपतींची मान्यता मिळते असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणूक आयुक्तांचा एक निश्चित कार्यकाळ असतो, ज्यामध्ये सेवानिवृत्ती 6 वर्षांनंतर किंवा त्यांच्या वयानुसार (जे जास्त असेल) दिली जाते. निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्तीचे कमाल वय ६५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच वयाच्या 62 व्या वर्षी कोणी निवडणूक आयुक्त बनले तर त्याला तीन वर्षांनी हे पद सोडावे लागेल.

एका अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे असेच म्हणावे लागेल कारण आज पर्यंतच्या इतिहासात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत सत्ताधारी पक्षाचा थेट हस्तक्षेप असल्याचे दिसून येत होते परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येईल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त ‘भारत जोडो यात्रे’ संदर्भातच होते, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सबोधित करताना “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे.” या सुचक भाषणातून सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

वृद्ध दांपत्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाल्याने गमावले तब्बल ८ लाख रुपये..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

इंटरनेट बॅंकीगचा युगात वापर जेवढा सोपा तेवढाच त्याच्या वापराबाबत योग्य सावधगिरी न बाळगल्यास लुटले जाण्याच्या खूप घटनाही समोर येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते. नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडप्याला तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडपे त्यांच्या डिश वॉशरसाठी कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधत होते. तिथे त्यांना एक नंबर सापडला जो आयएफबी कस्टमर केअरच्या नावाने नोंदणीकृत होता. सध्या हा नंबर बंधन बँकेचा कस्टमर केअर नंबर म्हणून नोंदणीकृत आहे. या नंबरवर कॉल केला असता एका महिलेने फोन उचलला व तिने आपल्या वरिष्ठांकडे फोन दिला.

वरिष्ठ महिलेने फोन करणाऱ्या वृद्ध महिलेला ‘एनीडेस्क’ हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यात आपली माहिती भरण्यास व १० रुपये भरून तक्रार दाखल करण्यास सांगितले. या दरम्यान अनेकदा त्यांचा फोन कट झाला व समोरील महिलेने तिच्या वैयक्तिक नंबरवरून कॉल केला. त्याच दिवशी संध्याकाळी ४.१५ वाजता जोडप्याच्या बँक खात्यातून २.२५ लाख रुपये काढले गेले. दुसऱ्या दिवशी ५.९९ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला. जोडप्याने पोलीसांकडे तक्रार केली, आपले बँक खातेही गोठवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले हे भारतीय वंशाचे उद्योजक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अमेरिकेत पुढील वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये आता भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी उतरले आहेत. ‘फॉक्स न्यूज’वर दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता ते सोशल मिडिया व्हिडीओद्वारे निवडणूक लढवण्यासाठी निधी संकलित करण्याबाबत लोकांना आवाहन करत आहेत.

रामास्वामींबाबत थोडक्यात माहिती

रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना पक्षात प्रवेश केला. विवेक यांनी २००३ मध्ये सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं. २००७ मध्ये त्यांनी हार्वर्डमधून पदवी घेतली. ३७ वर्षीय विवेक रामास्वामी हे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत. ‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’ मधील सर्जन आणि सहाय्यक प्राध्यापक अपूर्व तिवारी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. २०२२ मध्ये त्यांनी स्ट्राइव्ह ऍसेट मॅनेजमेंट नावाची नवीन कंपनी स्थापन केली. विवेक त्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

त्यांनी अमेरिकन कॉर्पोरेट्स मधील सामाजिक न्यायाच्या समस्यांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांनी बायोफार्मास्युटिकल कंपनी रिव्हॉल्ट सायन्सेसची स्थापना केली आहे. विवेक यांचे आई-वडील केरळहून अमेरिकेला गेले होते. त्यांचे वडील इंजिनिअर असून आई मानसोपचारतज्ज्ञ आहे. केरळमधील, वेदकेंचेरी, पलक्कड हे त्यांचे मूळ गाव.

राज्यातला पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले आणि सकाळी लवकर फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असा शपथविधी झाला होता .

हा निर्णय शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खुलासा नुकताच फडणवीसांनी करीत एकच खळबळ उडवून दिली होती, त्यावर थेट नकार न देता शरद पवार यांनी फडणवीस हे हुशार व्यक्ती आहेत मात्र ते असे काही बोलतील अशी अपेक्षा आपल्याला नव्हती असे सांगत नेहमीप्रमाणे गूढ वाढवले होते.

पुन्हा पवारांनी यावर भाष्य करीत त्यावेळी लागलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी हा विषय झाल्याचे सांगत याबाबतच्या चर्चेला पुन्हा हवा दिली तर ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत कोणी कोणाच्या भेटी घेऊन काय सांगितलं तेही पवारांनी सांगावे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी देत या विषयाला पुन्हा रंगतदार वळणावर आणले आहे.