Home Blog Page 14

*महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये किलबिलचा तेजस रणखांब राज्यात द्वितीय ..!!*

अहमदपूर:-
मासूम शेख

महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त असलेल्या ‘महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा’ 28 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये किलबिल नॅशनल स्कूल चा पाचवी वर्गातील विद्यार्थी तेजस मंगेश रणखांब याने या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरमसिंग शिराळे, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगताप यांनी तेजस आणि त्याचे पालक यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..!!

*अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ओबीसीचा सर्वपक्षीय उमेदवार म्हणून एडवोकेट भारत भाऊ चामे*

अहमदपूर :-
मासूम शेख

सकल ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत, बहुजन समाजाचा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार म्हणून अॅड. भारत चामे यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज कोअर कमिटीची बैठक क्राइस्ट इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आली. सदरील कोअर कमिटीनी इच्छुक उमेदवार माजी आमदार बब्रुवान खंदाडे,गणेश दादा हाके, अॅड.भारत चामे,अॅड.माधवराव कोळगावे यांच्या मुलाखती घेतल्या उमेदवारी बद्दल कोअर कमिटी मध्ये एकमत होत नसल्याने इच्छुक उमेदवारांच्या सहमतीने कोअर कमिटीच्या सदस्यांचे गुप्त मतदान घेण्यात आले.मतपत्रीकेची मोजणी सर्वांसमक्ष करण्यात आली.त्यामध्ये अॅड. भारत चामे यांना सर्वाधिक मतदान मिळाल्यामुळे अॅड.भारत चामे यांचे नाव अहमदपूर येथील जिजाऊ फंक्शन हाॅल मध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषित करण्यात आले.
सकल ओबीसी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या,दलीत ,बहुजन समाजाचा अहमदपूर, चाकुर तालुक्यातील सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून अॅड.भारत चामे यांच्या नावाची घोषणा कोअर कमिटीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सदरील कोअर कमिटीच्या बैठकीस माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील,डॉ.अशोक सांगवीकर,एन. आर. पाटील, भारत रेड्डी, जिवणकुमार मद्देवाड, अॅड. भारत चामे,सांब महाजन, अशोक काका केंद्रे,त्रंबक आबा गुट्टे,किशोर मुंडे, अॅड.माधवराव कोळगावे, बालाजी रेड्डी,
चंद्रकांत मद्दे, नितीन रेड्डी,गंगाधर केराळे,श्रीकांत बनसोडे,सज्जन लोणाळे गोविंद गिरी,मधुकर मुंडे,मार्शल माने, शंकर चाटे, सुरेश मुंडे, हणमंत देवकते, माणीक नरवटे, पंडित पवार, सलीम तांबोळी, आत्माराम डाके
यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल ओबीसी,अल्पसंख्याक,भटक्या,दलीत, बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार गोविंद गिरी यांनी मानले

*अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तीन लाख 47 हजार मतदार*, *376 मतदान केंद्राची व्यवस्था*

अहमदपूर:-
मासूम शेख

  • महाराष्ट्र विधानसभे च्या नवीन निवडणुकीचा बिगुल वाजला असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील तीन लक्ष 47 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणारा असून त्यासाठी 376 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राज्य शासनाच्या वतीने सर्वच स्तरावरची तयारी पूर्ण झाली आहे विधानसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार 746 पुरुष मतदार असून एक लाख 65 हजार 610 स्त्री मतदान आहे 376 मतदान केंद्रावर मतदान होणार असून मागील निवडणुकीच्या वेळेस 367 मतदान केंद्र होते त्यात नऊ मतदान केंद्राची भर पडले असून त्यात अहमदपूर मांडणी शिरूर ताजबंद दोन जानवळ हाडोळती दोन याचा समावेश करण्यात आले आहे 85 वर्ष वयावरील मतदाराची यादी तयार करण्यात आल्या असून घरपोच मतदानाची तयारीही करण्यात येणार असल्याचे सांगितले अहमदपूर तालुक्यात चार ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून त्यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे विभाग प्रमुखांच्या बैठकीत आचारसंहितेच्या पालन संबंधी सूचना करण्यात आले असून नगरपालिकेनेही शहरातील सर्व बॅनर काढून टाकले आहे त्यामुळे शहर बॅनर मुक्त झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सौ मंजुषा लटपटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर व नर्सिग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

*डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय व हक्क मिळाले.* *मा.आ. बब्रुवान खंदाडे*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजीत ६८ वा धम्मचक्र परिवर्तन दिन या कार्यक्रमानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील ध्वजारोहण माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे उद्घघाटक लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधव जाधव यांनी दीप प्रज्लवीत करून उद्घघाटन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उद्घघाटक पर भाषणात माधव जाधव म्हणाले की मी संविधानामुळेच मोठा झालो आहे मला विविध प्रकारची पदे मिळालेली आहेत व संविधानामुळेच मला प्रत्येक कामात यश मिळाले आहे आणि प्रत्येक जातीतल्या लोकांना सुद्धा याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढे चालून याचा लाभ असाच मला मिळेल आणि आपण सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे ज्यामुळे लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर किती उंचीचे होते त्यांच्यासारखा विद्वान माणूस या जगात होणार नाही आणि झाला नाही असे आपल्या उद्घघाटक पर भाषणात माजी जि. प. सदस्य माधव जाधव म्हणाले.
यानंतर माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे आपल्या भाषणात म्हणाले की तथागत गौतम बुद्धाच्या नंतर या पृथ्वीतलावरी तेजस्वी सुर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जाते आणि रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप वर्षे अभ्यास करून त्यांनी येवला येथे मी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला. अशा महामानवाची कार्य आपण कदापि विसरू शकत नाही. आणि डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय व हक्क मिळाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे पाच लक्ष लोकांसमोर हा बुद्ध धम्म समाजाच्या लोकांना दिला. म्हणून आपण सर्वांनी बौद्ध धम्माचे आचरण करावे असे पुतळ्यासमोर दि.14 -10 – 2024 रोजी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या अभिवादन सभेमध्ये आपल्या भाषणात माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले.
प्रास्ताविक पर भाषणात सौ अंजलीताई अरुण वाघंबर म्हणाल्या की बुद्ध धम्म ही घर वापसी है.. ! क्योंकी यह भारत भूमी प्राचीन काल से बुद्ध की है..! बुद्ध धम्म ही प्राचीन धर्म है आज लाखो करोडो लोग बुद्ध धम्म का आचरण कर रहे है..! और अपना जीवन मंगलमय कर रहे है..!
बुद्ध धम्म हा शांतीचा धम्म आहे. बुद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे. या धम्मामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही. असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सौ.अंजली अरुण वाघंबर या म्हणाल्या.
यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपीनाथ जोंधळे, श्रीकांत बनसोडे, इमरोज पटवेकर, सरस्वती कांबळे, श्रीरंग गायकवाड, श्याम देवकते, इत्यादी मान्यवरांनी महापुरुषांच्या जीवनावर व त्यांनी केलेल्या कार्यावर आपल्या भाषणातून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे पंचशील ध्वजारोहण माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते.तर, उद्घघाटक म्हणून माजी जि.प. सदस्य माधव जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, श्रीकांत बनसोडे,सौ. अंजली वाघंबर, दैवशाला वाघंबर,
रसिका बनसोडे,शकुंतला बाई बनसोडे, प्रतीक्षा ससाने, महानंदा दाभाडे, श्याम देवकते, इमरोज पटवेकर, सरस्वतीबाई कांबळे, डॉ. संजय वाघम्बर, गायकवाड सर, अण्णाराव सूर्यवंशी, जीवन गायकवाड, यशोधरा महिला मंडळ सैनिक कॉलनी अहमदपूर , तसेच रमाई महिला मंडळ अहमदपूर, बाबासाहेब वाघमारे, प्रकाश फुलारी, अभय मिरकले, पत्रकार भीमराव कांबळे, शेटीबा शृंगारे, त्रिशरण वाघमारे, जीवन गायकवाड, वाल्मीक कांबळे, देविदास ससाणे,विठ्ठल गायकवाड, सौ. अंधोरीकर ताई, जयश्री ताई गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्रिशरण पंचशील सौ.अंजली वाघंबर, यांनी घेतले.
तत्पूर्वी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
हा ६८ वा धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक / संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, कलीम अहमद, आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड, रितेश वाघम्बर, केतन लामतुरे,झैद पठाण, आकाश व्यवहारे, श्रीरंग गायकवाड, लक्ष्मण बनसोडे,नामपल्ले,आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार श्रीरंग गायकवाड यांनी सर्वांचे मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आणि शाहीर सोनबा शिरसाट अँड संच यांचा भीम बुद्ध गीतांचा दणदणीत असा कार्यक्रम दिवसभर झाला.

*अहमदपुरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज नाम फलकाचे अनावरण सोहळा उत्साहात साजरा* *राष्ट्रसंताच्या जीवनाचा त्याग सचोटी समर्पणाची तरुणांनी प्रेरणा घ्यावी* *परम पूज्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांचे प्रतिपादन*

अहमदपूर :-
मासूम शेख

पश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानूकरणामुळे आज भारतीय समाजामध्ये विसरण्याची प्रथा वाढल्याचे सांगून येणाऱ्या काळात जीवन घडवायचे असल्यास नवतरुणांनी राष्ट्रसंताच्या जीवनातील त्या सचोटी समर्पणाची प्रेरणा घेऊन आपले जीवन सफल करावे असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.
दि .15 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेस डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले त्याच्या नामांतर फलकाचा अनावरण सोहळ्यात अशिर्वचन प्रसंगी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते.
या समयी व्यासपीठावर आमदार बाबासाहेब पाटील, वीरमट संस्थांनचे मठाधिपती युवा संत परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, प्रमुख अतीथी म्हणून भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके-पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट भारत चामे, माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे, ओम शांती केंद्राच्या प्रमुख छाया बहिणजी, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य एडवोकेट निखिल कासनाळे,न प चे मुख्याधिकारी संतोष लोमटे, भाजपाचे राजाभाऊ मजगे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवन मददेवार, अभय मिरकले, अजहर बागवान, प्राचार्य शिवाजी कवलेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, पुस्तकापेक्षा फिरल्यामुळे सुद्धा निसर्गसृष्टी आपल्याला कळते. राष्ट्रसंता सारखे निस्वार्थपणे जीवन जगावे. येत्या काळात पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे प्रवक्ते गणेश दादा हाके, एडवोकेट भारत चामे,संयोजक निखिल कासनाळे यांचे मनोगत वर भाषण झाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रसंताच्या प्रतिमा पूजनाने करून फलकाचे अनावरण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी कवलेकर, सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार तुकाराम सुरवसे यांनी मांनले.
या कार्यक्रमाला ओम प्रकाश पुणे ,दयासागर शेटे, पांडुरंग मिरकले, शंकराप्पा भालके, वसंतराव शेटकार, डॉक्टर अमृत चिवडे, डॉक्टर ऋषिकेश पाटील, शिवकुमार उटगे, प्रा. विश्वभर स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.